नवरा-बायकोच्या नात्याला काळीमा, नवऱ्याने बायकोसोबत केले असे, ऐकून व्हाल थक्क…

नवरा-बायकोच्या नात्याला काळीमा, नवऱ्याने बायकोसोबत केले असे, ऐकून व्हाल थक्क…

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमात पडले, नंतर लग्न आणि लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांत बायकोला 55 वर्षीय व्यक्तीला एक लाख रुपयांना विकण्यात आले. एवढेच नाही तर त्या नवऱ्याने एक महागडा मोबाईल फोन खरेदी केला त्या पैशामधून. आता पोलिसांनी या प्रकरणातील पी’- डि’- ते’- ची सुटका केली आहे.

घटनेत,नवरा अल्पवयीन आहे, पोलिसांनी त्याला सुधारगृहात पाठवले आहे. हे प्रकरण ओडिशातील बालंगीर जिल्ह्यातील बेडपाडा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. काही महिन्यांपूर्वी येथे एक 17 वर्षांचा मुलाचा एका 24 वर्षीय मुलीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती.

मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोन्ही कुटुंबातील बंध अधिक घट्ट झाले. दोघांनी लग्न केले. ओडिशा पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, लग्नाच्या काही काळानंतर नवरा-बायको दोघेही रायपूरला गेले आणि वीटभट्टीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले. दरम्यान, त्यांची आर्थिक स्थिती सुधारली नाही.

ओडिशा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तो राजस्थानला गेला आणि 55 वर्षीय व्यक्तीसोबत त्याच्या बायकोचा एक लाख रुपयांमध्ये सौ’- दा केला. तो पैसे घेऊन परतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने पैशाचा काही भाग अन्नावर खर्च केला आणि उर्वरित पैशाचा एक महागडा फोन विकत घेतला.

इतकेच नाही तर त्याची बायको दुसऱ्या कोणासोबत पळून गेल्याचे त्याने स्वतःला आणि मुलीच्या कुटुंबीयांना सांगितले. पण मुलीच्या घरच्यांनी त्याचे ऐकले नाही. त्यांनी ओडिशातील बेलपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला.

सुरुवातीच्या तपासातच पोलिसांना नवऱ्याच्या हाल चाली आणि त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स सं’- श’- या’- स्पद वाटले. त्यानंतर लवकरच या प्रकरणा वरून पडदा उचलण्यात आला. नवऱ्याच्या सांगण्यावरून पोलीस पथकाने राजस्थानमधून मुलीची सुटका केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने न्यायालयात सांगितले की, तिच्या नवऱ्याने पैशाच्या लाल से पोटी तिला दुसऱ्याला विकले.

न्यायालयाच्या आदेशानुसार, मुलगी तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. तर आरोपी नवऱ्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. नवऱ्याच्या कथेनुसार, त्याने त्या व्यक्तीकडून फक्त 60 हजार रुपये कर्ज म्हणून घेतले होते, जे त्याला नंतर परत करायचे होते.

Team Marathi Tarka

Related articles